नांदेडपरिसरराजकीयशहर

केवळ ९ कामाठींवर स्वच्छतेचा भार; ३ स्वच्छता निरीक्षकांची ‘ देखरेख’ अन् कंत्राटीच्या वेतनाचा भ्रष्टाचार !

देगलूर : ​शहराला स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याचा दावा करणाऱ्या स्वच्छतेचा पुरस्कार प्राप्त नगरपरिषद प्रशासनाचा भोंगळ कारभार आता चव्हाट्यावर आला आहे. संपूर्ण शहराची स्वच्छता करण्याची जबाबदारी अवघ्या ९ कर्मचाऱ्यांवर सोपवण्यात आली असून, गंमत म्हणजे त्यांच्यावर देखरेख ठेवण्यासाठी तब्बल ३ स्वच्छता निरीक्षक तैनात आहेत. कामापेक्षा ‘साहेब’ लोकांचीच संख्या जास्त असल्यामुळे शहरात स्वच्छतेचा बोजवारा उडाला असून, कंत्राटी पद्धतीमधील स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या वेतन भत्त्यातील मोठ्या भ्रष्टाचाराचा वास आता नागरिकांपर्यंत पोहोचू लागला आहे.

​शहराची झाली ‘कचराकुंडी’

​गेल्या काही महिन्यांपासून शहरातील मुख्य रस्ते, गल्लीबोळ आणि कचऱ्याने माखलेले आहेत . कचरा कुंड्या काढलेले असल्याने ऐन रस्त्यावरच कचऱ्याचे ढीग साचल्याने दुर्गंधी पसरली असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ९ कर्मचारी एवढ्या मोठ्या शहराचा कचरा कसा उचलणार, असा साधा प्रश्नही प्रशासनाला पडलेला नाही. परिणामी, शहराची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे.

Oplus_16908288

​कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नावाखाली ‘काळाबाजार

​गेल्या काही महिन्यांपासून शहरातील मुख्य रस्ते, गल्लीबोळ आणि कचरा कुंड्या ओसंडून वाहत आहेत. ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचल्याने दुर्गंधी पसरली असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ९ कर्मचारी एवढ्या मोठ्या शहराचा कचरा कसा उचलणार, असा साधा प्रश्नही प्रशासनाला पडलेला नाही. परिणामी, शहराची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे.

​कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नावाखाली ‘काळाबाजार’?

​मिळालेल्या माहितीनुसार, कागदोपत्री अनेक कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती दाखवून त्यांच्या नावावर दरमहा हजारो रुपयांचे बिल व इतर भत्ते उचलले जात असते. ​त्यांच्या हक्काचा पगार कोणाच्या खिशात जातोय?कंत्राटदार मुख्याधिकारी आणि स्वच्छता निरीक्षक हे मिळून कंत्राटी स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या वेतन व इतर भत्त्यावर डल्ला मारत असल्याचेही दबक्या आवाजात बोलले जात आहे .

​३ निरीक्षक करतात काय?

​नऊ कर्मचाऱ्यांच्या पाठीवर तीन निरीक्षक कशासाठी, असा सवाल आता जनता विचारत आहे. पालिकेत एकूण 150 च्या वर कर्मचाऱ्यांची संख्या आहे ती वाढवण्याऐवजी फक्त कागदी घोडे नाचवण्यात आणि कंत्राटदाराची बिले मंजूर करण्यातच या निरीक्षकांना रस असल्याचे दिसून येत आहे.

​नागरिकांचा इशारा: आंदोलन छेडणार!

“आम्ही नियमित स्वच्छता कर भरतो, मग आम्हाला घाणीच्या साम्राज्यात का राहावे लागत आहे? कंत्राटी पद्धतीमधील भ्रष्टाचाराची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे आणि शहरात पुरेशा कर्मचाऱ्यांची नियुक्ती झाली पाहिजे, अन्यथा आम्ही नगरपरिषदेवर ‘कचरा फेको’ आंदोलन करू,” असा इशारा स्थानिक रहिवाशांनी दिला आहे. ​आता या गंभीर प्रकारावर मुख्य अधिकारी काय कारवाई करतात आणि कंत्राटदाराचा हा ‘भ्रष्टाचाराचा कचरा’ कधी साफ होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .

​आ

​प

​म

​त

​अ

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!