PRAJASHILPdigital
नांदेड - सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले निष्ठावान कार्यकर्ते भगवान गायकवाड यांच्या विविध कार्याची दखल घेऊन मुजीब भाई मित्रमंडळाच्या वतीने त्यांना वादळवारा हा पुरसस्कार जाहिर झाला असून रविवार 23 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजता शंकरराव चव्हाण प्रेक्षाग्रहामध्ये विविध मान्यवारांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे.
मुजीबभाई मित्र मंडळ नांदेड यांच्या वतीने महाकवी वामनदादा कर्डक यांच्या 104 व्या जयंतीनिमित्त गीत वामनाचे हा कार्यक्रम रविवार 23 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजता आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमात दिल्या जाणाऱ्या वादळवारा पुरस्कारासाठी भगवान गायकवाड यांची निवड झाल्याचे निवड पत्र मुजीबभाई मित्र मंडळ यांच्या जनसंपर्क कार्यालयात भगवान गायकवाड यांना देण्यात आले. यावेळी निवड पत्र देताना मुजीब भाई मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष सय्यद मुजीब भाई, मित्र मंडळाचे जिल्हाध्यक्ष गंगाधर वङणे, सल्लागार. प्रभू सावंत, प्रा. अविनाश नाईक,विजय उजेडेकर, पडघने, रवींद्र सोनकांबळे पत्रकार आदींची उपस्थिती होती.
पुरस्कार मिळाल्याबद्दल आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते सुरेश गायकवाड, बुद्धीस्ट सोशल ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष प्रा. शुद्धोधन गायकवाड, पत्रकार दत्ताहरी धोत्रे, चवदार तळे राष्ट्रीय जलदिनाचे प्रणेते महेंद्र पिंपळगावकर, डॉ. राम वाघमारे, बाबूराव कसबे, संजय नरवाडे, मिलिंद चावरे, अशोक दामोधर, रवी लोहाळे, मिलिंद व्यवहारे, सुभाष काटकांबळे, नंदकुमार बनसोडे, पद्माकर सोनकांबळे, महेंद्र पिंपळगावकर, किशोर अटकोरे, चंद्रमुनी कांबळे, राजू कदम यांच्यासह अनेकांनी भगवान गायकवाड यांचे अभिनंदन केले
